Posts

Showing posts from November, 2017

वाडघीन

Image
*वाडघीन* लेखाचं शीर्षक वाचून  तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल वाडघीन म्हणजे काय? वाडघीन हा पालघर परिसरातील आदिवासी भागातील बोली भाषेतील शब्द आहे .वाडघीन म्हणजे आजी .       प्रसंग आहे आमच्या शाळेतील २०१६-१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली .पहिलीसाठी मुलांची नावनोंदणी सुरु झाली आणि काही दिवसांतच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली .पहिलीचे बालगोपाळ रोज शाळेत येवू लागले. बऱयाच मुलांचे पालक पहिल्या दिवशी मुलांना शाळेत सोडून गेले आणि नंतर मुले रोज शाळेत येवू  लागली .अशा प्रकारे पहिलीचा वर्ग सुरू झाला .पण पहिलीचा एक विद्यार्थी  शाळेत बसून रोज मोठमोठ्याने रडायचा.  मुले त्याला रडक्याच  म्हणायची. हा रडक्या संपूर्ण वर्गात रडून मोठा गोंधळ करायचा .आता हा रडत असेल तर शिकवणार कसं ही मोठी पंचायत व्हायची शिक्षकांची. आता त्यावर उपाय काय? हाही प्रश्न पडला होता. त्याला कितीही समजून सांगितले तरी त्याचे रडणे काही कमी होत नव्हते .कारण त्याला  घराबाहेर राहण्याची अजिबात सवय नव्हती आणि शाळेतले नवीन वातावरण पाहून तो अगदी घाबरून जात असे . त्यामुळे ...

आठवण

Image
माझे लेख लग्नानंतर एक नवीन व्यक्ति आपल्या आयुष्यात येते .सुरुवातीला एकमेकांचा स्वभाव सवयि आवडी निवड़ी जाणून घ्यायला जरा वेळ लागतो .हळू हळू प्रेमाचे आपुलकीचे एक घट्ट नाते तयार होते .एकमेकांची सवय इतकी होते की काही दिवस  सुद्धा दूर राहिले की चुकल्यासारखे होते .  आमच्याही लग्नाला वर्ष झाली होती . सरू व मी अतिशय मजेत राहत होतो. दोन वर्ष कधी एकमेकांच्या शिवाय राहन्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. रोजचे रूटीन कसे फिक्स झाले होते . सकाळी आरामात उठायचे गप्पा मारत चहा प्यायचा .मधेच एकदा विनोद झाला की खळ खळून हसायचे . रोज अंघोळीसाठी गरमागरम पाणी .नंतर गरमागरम नाश्ता व कामावर जातांना गरमागरम डब्बा .हे गणित पक्के झाले होते . दुपारी जेवतांना तिची आठवण आली की फ़ोनवर बोलणे व्हायचे. संध्याकाळी जातांना काहीतरी छोटेसे सरप्राइज घेवून जायचे . वेळात वेळ काढून समुद्र किनारी फिरायला जायचे .असे अगदी आनंदात दिवस जात होते .मधेच एक आणखी आनंदाची बातमी समजली .आम्ही आईबाबा होणार होतो .दोघेही प्रचंड खुश होतो .बोलता बोलता तिला सात महीने झाले. ती तिच्या माहेरी पहिल्या बाळंत पणासाठी गेली . बाळाच्या आगमनाची ...

Thank you

Image
माझे लेख २००८ मधे माझे डी एड पूर्ण झाले .मी नोकरीच्या शोधात होतो .तेवढ्यात ठाणे जिल्हा परिषद च्या शिक्षक भरतीच्या जागा रिक्त असल्याची जाहिरात आली .मी अर्ज केला .मुलाखत झाली .माझी निवड सुद्धा झाली .डहाणू तालुक्यात मला पदस्थापना देण्यात आली .कोसेसरी नावाच्या शाळेवर मला हजर व्हायचे होते .मी बॅग भरली आणि शाळेत हजर होण्यासाठी निघालो .मनात अनेक प्रश्न होते .शाळा कशी असेल? तिथे शिक्षक कसे असतील ?मला तिथे करमेल का ? सर्वात मोठा प्रश्न होता राहयचे कुठे? हा सर्व विचार करत मी विचारत विचारत शाळेत येवून पोहचलो .अतिशय दुर्गम व् आदिवासी भागातील शाळा होती .तेथील लोकांची भाषा सुद्धा पुरेशी समजत नव्हती .तेथील एकूण परिस्थिति पाहून त्या गावात राहणे मला शक्य वाटत नव्हते .माझी भीती वाढत होती की ;मी बॅग घेवून जाणार कुठे ?शाळेत पोहचन्यासाठी मला चार वाजले होते. मी वर्गात प्रवेश केला .शिक्षकहि तिथे होते .सतेश पांडूळे त्यांचे नाव .माझ्यापेक्षा तीन चार वर्षांनी मोठे .आमचा परिचय झाला .मी न सांगताच त्यांनी माझ्या मनातील घालमेल ओळखली .ते म्हणाले आता शाळा सुटेल आपण माझ्या घरी जावु .मला खुप् हायसे वाटले .त्यांच्...